शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३
सफर जिंदगी का....
गुरुवार, २७ एप्रिल, २०२३
दुष्काळ म्हणजे…नक्की काय असतं ग आई… ?
रविवार, २ एप्रिल, २०२३
ती आणि शहर...
शनिवार, १ एप्रिल, २०२३
सिंगल माणसांचा पक्ष...
रविवार, १ जानेवारी, २०२३
घरी नवरा असतानाही का ठेवले जातात बाहेर अनैतिक संबंध ? महिलांनीच सांगितला अनुभव !
आपण आपल्या प्रत्येकाच पर्सनल आयुष्य कस जगायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, त्यातही आपल्याला लैंगिक सुखाबद्दल सल्ले दिलेले कधीच आवडत नाहीतच. पण या गोष्टीचा विचार मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून करायचा ठरवला तर घरी आपला मनासारखा आणि सुंदर जोडीदार असून देखील बाहेर संबंध का ठेवावे वाटतात? याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. या बद्दलच आज आपण बोलणार आहोत.
आपली मनोविकासाच्या पाच अवस्था सिग्मंड फ्राॅइड या मनोविकास तज्ञांनी मांडलेल्या आहेत. यामध्ये या अवस्था सायको सेक्स्युअल डेव्हलपमेंट होत असताना आढळून येतात. या अवस्थेची पूर्तता वय जसे वाढेल तसे वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. जेव्हा बाळ जन्मल्याबरोबर सर्वात आधी मातेचे स्तनपान करते. तसेच व्यक्ती आपली प्रत्येक अवस्था वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.
दोन अनोळखी व्यक्तींना जन्मभरासाठी एका पवित्र नात्यांत बांधून ठेवणारे अनोखे बंधन म्हणजे विवाह बंधन आहे, नवरा बायको यांना शरीर संबंध ठेवण्याचा नैतिक अधिकार यामुळे मिळत असतो. मात्र आपण सध्या पाहत आहोत कि घरी आपला सुंदर जोडीदार असून सुद्धा त्याच्या कडून शारीरिक सुख मिळत असून सुद्धा व्यक्ति बाहेर संबंध का ठेवते?
कमजोरी :- आजच्या या धावत्या जगात आपण पहात असाल की आपले आयुष्य किती बदलल आहे, आपला आहार, आपल्याला लागलेल्या घाण सवयी, धूम्रपान याचा सर्व परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होत आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक पुरुष हे कमजोरी, टिकून न राहणे या सारख्या समस्यांना बळी पडत आहेत.
आदर न मिळाल्यामुळे :- जर पतीकडून एखाद्या महिलेला आदर, स्वाभिमान मिळत नसेल तर अशावेळी अधिक आदर आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी ती इतरांशी संबंध बनवते. आपला हक्क, अधिकार आणि दर्जा जेव्हा पती पत्नीला देत नाही, तेव्हा ती स्त्री बंडखोर आणि निर्भय होते.
पैशाचा मोह :- आताच्या महिलांमध्ये पैशाचा मोह वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात आणि अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. पतीद्वारा या इच्छा पूर्ण होत नसल्याने, खर्च करायला पैसे मिळत नसल्याने महिला पैशेवाल्या व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेवतात.
एकटेपणा :- केलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की मेट्रो शहरांतील महिला या एका कारणांमुळे सर्वात जास्त अनैतिक संबंध बनवतात, आपल्याला माहित आहे की अनेक महिलांचे पती हे परदेशात वैगेरे कामाला, असतात किंवा अनेक महिलांचे पती हे एकदा कामाला बाहेर गेले कि ते दोन-तीन महिने घरी येत नाही.
अशावेळी अनेकदा महिलांना पती सोबत नसल्याने एकट्या पडल्या सारखं वाटतं, तसेच अशा पद्धतीचे मेट्रो शहरातील वातावरणच असते कि अशा वेळेस महिला अनैतिक संबंधाच्या दिशेकडे खेचले जातात. त्या या मार्गावर त्यांना वाटत असलेला एकटेपणा घालवण्यासाठी नाईलाजाने निघून जातात.
भावना समजून न घेणे :- सर्वात मोठे कारण विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे म्हणजे एकमेकांच्या भावना समजून न घेणे. जेव्हा पती हा पत्नीची भावना समजून घेत नसेल, तेव्हा तिला खूप वाईट वाटते. आजच्या स्त्रीला जर तिच्या पतीकडून सन्मान मिळाला नाही तर ती बंडखोर बनते. याच परिणाम म्हणून ती एखाद्याच्या प्रेमात पडते ज्याला तिच्या भावना समजतात.
लग्नाला कंटाळणे :- स्त्रियांना एखाद्या गोष्टीने खूप कंटाळा येतो. ही बाब जर आजकाल वै ्वाहिक नात्यात लागू असेल तर आश्चर्य वाटणारी आहे. जेव्हा एखादी स्त्री लग्नाला कंटाळते तेव्हा असे दिसून आले आहे की ती तिच्या आयुष्यात उत्साह आणि ताजेपणा आणण्यासाठी ती बाहेरील व्यक्तीबरोबर संबंध ठेवते.
संकलन : सुशिल म. कुवर
फोटो: प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.